(Google による翻訳)私も兄弟が言ったヴィマラ・ノーティヤル・カウサニのアシュラムのように国のために働きたいです。 17 歳、1947 年 - 当時、女の子はこの年齢で結婚していました。しかし、ヴィマラは私が国のために働くという嫉妬を抱いて「ラクシュミ・アシュラム」にやって来ました。このアシュラムは「サーラ・ビーアン」、つまりガンジーを支援するために英国を離れインドへ渡ったキャサリン・メアリー・ハイルマンによって設立されました。 「新しい訓練」によると、そこでは自立、紡ぎ、村の救助、依存症をなくす活動が行われた。彼はそれを6年間続け、1953年から1954年の一年をサルラーベンとともにヴィノバ・バーベの「ブーダン」運動に捧げた。他の 20 代と 25 代の人々が「料理をして、育てて...」というサイクルに陥っている一方で、ヴィマラさんは村に自信と士気を植え付けるために努力していました。彼女はアシュラムでも教え始めました。彼はこの仕事の重要性を強く確信していたので、将来の夫に政治から離れ、この村に留まるという条件を出した。私たちは二人ともサルボダヤで十分な収入を得て働きます。
夫の名前はサンダーラール・バフグナ…当時のテーリ地区の議会の若い指導者。彼は本当に政治家を辞めた。彼が初めてシリヤラ村に来て、そこの土地を平らにして小屋を建て、それからヴィマラ・ノーティヤル、ヴィマラ・バフグナを建てたのは1954年のことだった。婚姻費用 Rs 48- これも新郎と新郎が折半しました。あの世でもヴィマラさんは決してサリー(ジュエリー)を身に着けることはありませんでしたが、この夫婦はヒマラヤのテーリ地方の「服装」を阻止するために「チプコ」運動を立ち上げたのです!この運動は 1973 年に始まりましたが、ヴィマラ バフグナさんは 1955 年から村の女性たちと協力し始めました。ここで女性たちの声を組織し、パンチクロシを依存症から解放しました!その後、1995 年に「ジャムナラル バジャージ賞」がこの作品に注目しました。 Tehri Garhwal 氏 - 女性たちと話すとき、彼には言葉の壁はありませんでした。ヴィマラさんは幼い頃から、1942年の運動で教育を放棄し投獄された兄弟たちの脅威を目の当たりにしていた。彼の父親、ナラヤン・ナウティヤルは森林局の中級職に就いており、イギリス統治時代に森林官になるようアドバイスを受けた際、昇進を逃したのは、彼が「子どもたちの命は子どもたちのものだと信じている」という断固たる立場をとったためであり、この立場は単に便宜上のものであったため、子どもたちが家で「ハリジャン」と口論を始めても、父親は沈黙を保っており、これらの儀式はすべてヴィマラで行われていた。
それが、ヴィマラとサンダーラール・バフグナの両方が「チプコ・アンドラン」または「ナブジヴァン・アシュラム」から運営される「山岳環境保護委員会」の活動を設立した理由です。ガンジーがどのようにしてカストゥルバス家を「ガンジー主義」に改宗させたかについての物語が語られていますが、サンダーラールとヴィマラについての物語は一つも見つかりません。それは共生でした。それは2021年、チャルダム・ヤトラの「楽しい体験」のために道路を建設する政府を前に、ヴィマラディディスさんは無力感を感じたとき、新型コロナウイルス感染症によるサンダーラールさんの死で終わった。この後、彼は希望を失い、翌日には自らの命も断念した。
(原文)
मलाही भावांप्रमाणेच देशकार्य करायचे आहे’ अशा हट्टापायी विमला नौटियाल कौसानीच्या आश्रमात गेल्या. वय १७ आणि सन १९४७- त्या वेळी, या वयात मुलींची लग्ने होत. पण मी देशासाठीच काम करणार अशा ईर्षेने विमला ‘लक्ष्मी आश्रमा’त आल्या. हा आश्रम ‘सरला बहन’ यांनी- म्हणजे गांधीजींना साथ देण्यासाठी ब्रिटन सोडून भारतात आलेल्या कॅथरीन मेरी हायलेमान यांनी - स्थापला होता. ‘नयी तालीम’नुसार तिथे स्वावलंबन, सूतकताई, ग्रामोद्धार, व्यसनमुक्ती हे कार्य चाले. ते त्यांनी सहा वर्षे केले आणि १९५३ ते ५४ हे अख्खे वर्ष विनोबा भावे यांच्या ‘भूदान’ चळवळीसाठी सरलाबेनसह समर्पित केले. २० ते २५ वयाच्या इतरजणी पोराबाळांमध्ये आणि ‘रांधा, वाढा...’ च्या चक्रात अडकत असताना विमला मात्र खेड्यांना आत्मविश्वास आणि नैतिक बळ देण्याचे काम करत होत्या. आश्रमात शिकवूही लागल्या होत्या. या कामाचे महत्त्व त्यांना इतके पटले होते की होणाऱ्या नवऱ्याला त्यांनी अटच घातली- राजकारण सोडा- इथेच गावात राहा. पोटापुरते कमावून आपण दोघेही सर्वोदयाचे काम करू.
नवऱ्याचे नाव सुंदरलाल बहुगुणा... त्या वेळच्या काँग्रेसचे टिहरी भागातील तरुण नेते. त्यांनी खरोखरच राजकारण सोडले. १९५४ मध्येच ते आधी सिलयारा गावात आले, तिथे जमीन थोडीबहुत समतल करून झोपडी उभारली आणि मग विमला नौटियाल, विमला बहुगुणा झाल्या. लग्नखर्च ४८ रुपये- तोही वधुपक्ष आणि वरपक्षाने निम्मा निम्मा वाटून घेतला. पुढल्या संसारातही कधी साड्या-दागिने यांचा सोस विमला यांनी केला नाही- पण या जोडप्याने, हिमालयाच्या टिहरी भागाचे ‘वस्त्रहरण’ थांबवणारी ‘चिपको’चळवळ उभारली! ते आंदोलन १९७३ मधले, पण १९५५ पासून गावातल्या महिलांसह विमला बहुगुणांनी काम सुरू केले. इथल्या महिलांचा आवाज संघटित करून पंचक्रोशी व्यसनमुक्त केली! पुढे १९९५ मध्ये ‘जमनालाल बजाज पुरस्कारा’ने या कामाची दखल घेतली. टिहरी गढवालच्या- महिलांशी बोलताना त्यांना भाषेचाही अडसर नव्हता. १९४२च्या चळवळीत शिक्षण सोडून तुरुंगवास भोगलेल्या भावांची धमक घडत्या वयातच विमला यांनी पाहिली होती. वडील नारायण नौटियाल हे वनखात्यात मध्यम दर्जाचे काम करीत, त्यांना वनअधिकारी होण्यासाठी ‘मुलांना जरा समजावा’ अशा कानपिचक्या ब्रिटिशकाळात दिल्या गेल्या तेव्हा ‘मुलांचे आयुष्य त्यांचे स्वत:चे आहे असे मी मानतो’ ही ठाम भूमिका घेतल्याने बढती हुकली- आणि ही भूमिका निव्वळ सोयीपुरती नसल्याने, घरातच मुलांकडून ‘हरिजनां’शी ऊठबस सुरू झाली तरीही वडील गप्प राहिले, हे सारे संस्कार विमला यांच्यावर होते.
त्यामुळेच ‘चिपको आंदोलन’ किंवा ‘नवजीवन आश्रमा’तून चालणारे ‘पर्वतीय पर्यावरण संरक्षण समिती’चे काम उभारले ते विमला आणि सुंदरलाल बहुगुणा या दोघांनी! गांधीजींनी कस्तुरबांना ‘गांधीवादा’कडे कसे वळवले, याच्या कथा सांगितल्या जातात- तशी एकही कथा सुंदरलाल आणि विमला यांच्याबद्दल सापडणार नाही. हे सहजीवनच होते. सुंदरलाल यांच्या कोविड-मृत्यूने २०२१ साली ते संपले, तोवर चारधाम यात्रेच्या ‘सुखद अनुभवा’साठी रस्ते बांधणाऱ्या सरकारपुढे आपण हतबल आहोत याची हताशाही विमलादीदींच्या सोबतीत आली होती. यानंतर त्यांनी उमेद सोडली, आणि परवा प्राणही सोडला.